तटकरे म्हणाले, “महायुती म्हणून भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे पक्ष स्थानिक निवडणुका एकत्र लढणार आहेत. काही ठिकाणी स्थानिक राजकीय परिस्थिती वेगळी असली, तरी ती समन्वयातून सोडविली जाईल. महायुतीत कोणाचाही कोणावर दबाव नाही. सर्व निर्णय समविचाराने घेतले जात आहेत.”
या दौऱ्यात त्यांच्यासोबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर देखील उपस्थित होत्या. पत्रकारांशी संवाद साधताना तटकरे म्हणाले की, “कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून निवडणूक लढण्याची मोठी इच्छा आहे. त्यामुळेच संघटनात्मक स्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही दौऱ्यावर आहोत.”
![]() |
| - Advertisement - |
महिलांवरील अत्याचारांवर कठोर पावले
जिल्ह्यातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त करताना तटकरे म्हणाले की, “महिला अत्याचाराच्या प्रकरणांवर सरकार संवेदनशील असून अशा गुन्ह्यांवर तातडीने कारवाई करण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम सुरू आहे. समाजात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यासाठी शासन कटिबद्ध आहे.”
‘महायुती’मध्ये प्रबळ समन्वय
तटकरे यांनी स्पष्ट केले की, “स्थानिक निवडणुकांमध्ये कोणताही प्रबळ विरोधक सध्या तरी दिसून येत नाही. मात्र प्रत्येक भागात राजकीय समीकरणे वेगवेगळी असतात. त्यामुळे आम्ही खबरदारी घेत आहोत आणि संपूर्ण ताकदीने निवडणुका लढविणार आहोत. मित्र पक्षांमध्ये मतविभाजन होणार नाही याची काळजी घेतली जाईल.”
![]() |
| - Advertisement - |
राज्याची आर्थिक स्थिती समाधानकारक
शेवटी बोलताना तटकरे म्हणाले की, “राज्याची आर्थिक स्थिती सध्या चांगली आहे. महायुतीच्या नेतृत्वाखाली विकासकामांना गती मिळाली असून आगामी काळात अधिकाधिक जनहिताचे निर्णय घेतले जातील.”
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."



