मोहाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद; दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी जावेद अन्सारी हे तिखी तलावात मासे पकडण्यासाठी गेले होते. मात्र, मासे पकडताना पाय घसरल्याने ते पाण्यात पडले. पाण्यात पडल्यावर त्यांच्या नाकात व तोंडात पाणी गेल्याने ते बेशुद्ध झाले. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी तातडीने मदतीला धाव घेतली. त्यांनी अन्सारी यांना पाण्यातून बाहेर काढून खाजगी वाहनाने चक्करबडी येथील हिरे रुग्णालयात दाखल केले.
![]() |
| - Advertisement - |
रुग्णालयात डॉक्टर विजय गायकवाड यांनी त्यांची तपासणी करून सोमवारी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास मृत घोषित केले. यानंतर नातेवाईकांनी मोहाडी पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली. पोलिसांनी प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
या दुर्घटनेमुळे अन्सारी कुटुंबियांसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मासे पकडण्याच्या छंदातूनच हा अपघात घडला असून, एक कुटुंब आपल्या कर्त्या व्यक्तीला गमावून बसले आहे. मोहाडी पोलिस अधिक तपास करत आहेत.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."


