धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहरातील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एमआयएम) पक्षाला आज मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे माजी आमदार फारुक शहा यांनी काही दिवसांपूर्वी एमआयएमला रामराम देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता धुळे जिल्हा आणि शहरातील अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनीही सामूहिक राजीनामे देत एमआयएमशी आपली नाळ तोडली आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
जिल्हा, शहर व युवा पातळीवरील प्रमुख पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी महिला जिल्हाध्यक्षा दीपश्री नाईक यांच्या उपस्थितीत आपले राजीनामे सादर केले. यामध्ये जिल्हाध्यक्ष मुख्तार बिल्डर, शहराध्यक्ष फातिमा अन्सारी, युवा अध्यक्ष रफिक पठाण यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणीचा समावेश आहे. विशेष म्हणजे, स्वतः जिल्हाध्यक्षा दीपश्री नाईक यांनीही राजीनामा दिला आहे.
![]() |
| - Advertisement - |
वरिष्ठांकडून दुर्लक्ष – पदाधिकाऱ्यांची नाराजी
त्यांनी पुढे सांगितले की, पक्षाच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सुटत नसतील, तर कार्यकर्त्यांवर जनतेचा रोष ओढवतो. त्यामुळे नैतिक जबाबदारी म्हणून आम्ही पक्षाचे सर्व पद आणि सदस्यत्वाचा सामूहिक राजीनामा देत आहोत.
राजीनामा देणाऱ्यांची यादी
राजीनामा देणाऱ्यांमध्ये –
- युवा अध्यक्ष – रफिक पठाण
- स्टुडन्ट युवा अध्यक्ष – आकीब सय्यद
- महिला शहराध्यक्ष – फातिमा अन्सारी
- जिल्हा उपाध्यक्ष – प्यारेलाल पिंजारी, कैसर अहमद, इकबाल शहा
- शहर कार्यकारी अध्यक्ष – अझहर सय्यद
- वाहतूक जिल्हाध्यक्ष – माजिद पठाण
- सचिव – फारुख अन्सारी, सहेजाद मन्सुरी
- महिला पदाधिकारी – सहेदा अन्सारी, मैमुना अन्सारी, अखिला सय्यद, रेहाना पिंजारीयांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे महिला जिल्हाध्यक्षा दीपश्री नाईक यांच्याकडे सादर केले.
![]() |
| - Advertisement - |
दरम्यान, जिल्हाध्यक्ष नासिर पठाण हे सध्या बाहेरगावी असून, ते परतल्यानंतर सर्वांचे राजीनामे अधिकृतरीत्या त्यांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
पुढील भूमिका लवकरच स्पष्ट होणार
या घडामोडीनंतर धुळे एमआयएममध्ये मोठी नेतृत्वशून्यता निर्माण झाली आहे. पदाधिकाऱ्यांनी लवकरच पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील राजकीय भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. या सामूहिक राजीनाम्यामुळे आगामी निवडणुकांपूर्वी एमआयएमच्या संघटनात्मक शक्तीला मोठा धक्का बसणार हे स्पष्ट झाले आहे.



