या निर्णयावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, “श्रद्धेचा आणि भावनेचा प्रश्न असलेल्या दिवशी अशी बंदी घालणे योग्य ठरते. उदाहरणार्थ, आषाढी एकादशी, महाशिवरात्री, महावीर जयंती अशा धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या दिवसांवर मांसविक्री बंद ठेवली जाते. परंतु, स्वातंत्र्यदिन हा राष्ट्रीय सण आहे, त्यावेळी अशा प्रकारची बंदी घालणे योग्य नाही.”
![]() |
| - Advertisement - |
अजित पवार पुढे म्हणाले, “देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्ष झाली आहेत. आपल्या समाजात शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचे लोक राहतात. कोकणात तर साधी भाजी करतानाही सुकट, बोंबील टाकले जाते, कारण तो त्यांचा परंपरागत आहार आहे. अशा गोष्टींवर बंदी घालणे उचित नाही. महाराष्ट्र दिन, २६ जानेवारी किंवा १५ ऑगस्टला अशा प्रकारच्या बंदीची सक्ती केली तर ती लोकांना अवघड वाटेल. ग्रामीण भागात तर अनेक ठिकाणी एखादा सण किंवा कार्यक्रम असताना बकऱ्याची कत्तल करून साजरा केला जातो. आदिवासी समाजाचा आहार देखील प्रामुख्याने मांसाहारावर आधारित आहे.”
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “भावना आणि श्रद्धा यांचा मान राखणे महत्त्वाचे आहे, पण त्याचा संदर्भ धार्मिक किंवा सांस्कृतिक परंपरेशी असावा. राष्ट्रीय सणाच्या दिवशी अशा बंदीचा आधार फारसा योग्य नाही.”
धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


